चुन्याचे घाणे – हरवलेलं पण पुन्हा उजळलेलं वारसास्थळ

 

चुन्याचे घाणे – हरवलेलं पण पुन्हा उजळलेलं वारसास्थळ


गडकोट, पुरातन मंदिरे आणि ऐतिहासिक वास्तूंच्या भक्कम तटबंदीमागे एक मौन नायक असतो – तो म्हणजे ‘चुन्याचे घाणे’.
कधी काळी या घाण्यांनी शेकडो ऐतिहासिक बांधकामांना मजबूत पाया दिला. पण आज त्याच घाण्यांकडे दुर्लक्ष होतंय. अनेक ठिकाणी ती मोडकळीला आलेली, विस्मरणात गेलेली आहेत... पण काही माणसं अशाही गोष्टींना पुन्हा उठवतात आणि इतिहासाशी नातं पुन्हा जुळवत जातात.

जुन्नर तालुक्यातील सुकाळवेढे गाव हे असाच एक प्रेरणादायी अपवाद ठरलं.


🪨 वरसुबाई मंदिरासमोरील चुन्याचे घाणे – पुनर्जन्माची गोष्ट

सुकाळवेढे गावातील प्रसिद्ध वरसुबाई माता मंदिरासमोरच हे जुनं, विसरलेलं चुन्याचं घाणं आहे.
या घाण्याचा महत्त्वाचा भाग – एक दगडी चाक – कित्येक वर्षांपूर्वी डोंगरावरून कोणी तरी खाली फेकून दिलं होतं.

पण या इतिहासप्रेमी मनात एक विचार घोळत होता –

"या चाकाला पुन्हा त्या घाण्यात बसवलं पाहिजे... इतिहासाशी त्याचं तुटलेलं नातं पुन्हा जोडावं पाहिजे."

हा विचार फक्त कल्पनांपुरता न राहता, ग्रामस्थांच्या सहभागातून साकार झाला.
बैलांच्या मदतीने, गावकऱ्यांनी ते दगडी चाक डोंगर पायथ्यापासून ओढत डोंगरमाथ्यावर आणलं आणि पुन्हा त्या घाण्याला अर्पण केलं.



🪔 हे फक्त एक चाक नव्हतं – हा होता इतिहासाशी जुळलेला नवा पूल!

आजकाल जर एखाद्या मंदिरास किंवा वास्तूस ‘अ, ब, क’ दर्जा (heritage status) प्राप्त करायचा असेल, तर त्या वास्तूचे किमान १०० वर्षांहून अधिक जुने पुरावे आवश्यक असतात.
अशा वेळेस, हे घाणं, चाक, समाध्या, वीरगळ, झाडं, दगडी मूर्ती – या गोष्टी केवळ पुरावे नाहीत, त्या आपल्या संस्कृतीच्या मूळशोधाच्या खुणा आहेत.


🙏 ग्रामस्थांप्रती विशेष कौतुक

सुकाळवेढे गावाच्या सर्व ग्रामस्थांचे मनःपूर्वक अभिनंदन!
इतिहासाच्या पुनरुज्जीवनात तुम्ही दिलेलं योगदान ही आजच्या पिढीसाठी एक आदर्श आहे.
ज्यांनी हा वारसा फक्त ‘पाहिला’ नाही, तर तो ‘सजवला’, ‘सांभाळला’ आणि ‘पुन्हा जिवंत’ केला.

Post a Comment

Previous Post Next Post